व्रतविधि – ज्येष्ठ शु. २ दिवशीं या व्रतधारकांनीं एकभुक्ति करावी, आणि ३ दिनीं प्रभातीं शुद्धोदकानें अभ्यंगस्नान करून अंगा-वर दृढधौत वस्ने धारण करावींत. सर्वपूजा साहित्य आपल्या हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशु-द्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पीठावर रत्नत्रयप्रतिमा (अर, मल्लि, मुनिसुव्रत तीर्थंकर जिनप्रतिमा )यज्ञ, यक्षीसह स्वापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. पंचत्रकालांचे चरु करावेत. श्रुत व गणधर पूजा करून यक्ष, यक्षो व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावे. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं अरमल्लिमुनिसुव्रततीर्थंकरेभ्यो यक्षयक्षीसहितेभ्यो नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्पे घालावीत. श्रीजिनसहस्रनाम स्तोत्र म्हणून णमोकारमंत्राचा १०८ वेळांचा १ जप करावा. ही व्रतकथा वाचावी. नतर एका पात्रांत एक पान व त्यांवर अष्टद्रव्ये व एक नारळ ठेऊन महार्घ्य करावे. त्याने ओवाळीत मंदिरात प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी. त्यादिवशी उपवास करून सत्पात्रांत आहार-दान द्यावें. दुसरे दिवशीं पूजा व दान करून पारणा करावीं. तीन दिवस ब्रह्मचर्षपूर्वक धर्मध्यानांत काल घालवावा.
या प्रमाणे प्रत्येक मासांतून दोनदां त्याच तिथीस हे व्रतपूजन करावें. अशा दहा पूजा पूर्ण झाल्यावर शेवटीं कार्तिक अष्टान्हिकांत याचे उद्यापन करावे. त्यावेळीं रत्नत्रय जिनविधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास चतुर्विध दाने यात्रीत. एका दंपतीस भोजन करवून त्यांचा वश्वादिकांनी सन्मान करावा, असा याचा पूर्णविधि आहे.
– कथा –
पद्मनंदी या नांवाचा एक राजा असून त्याला पद्मावतो नान्नी सुशील धर्मपत्नि होती. त्यांचा पद्मदत्त नानक राजश्रेष्ठो होता. त्याला पद्मनंदा म्हणून गुणवती स्त्री होती. तसेंच पद्मसेन नांवाचा राजपुरो-हित असून त्याला पद्मगदा नार्ने स्त्री होती. आणि पद्ममित्र नामक मंत्री असून त्याला पद्मलता नान्नो स्त्री होतो. यां सर्वं परिवारासद तो राजा अतिसुखांत आणि विनोदामध्ये कालक्रमण करीत होता.
एके दिवशी त्या नगराच्या उद्यानांत श्रीधराचार्य नांवाचे महा-मुनि येऊन उतरले, हैं शुमवृत्त राजांस कळतांच तो आपल्या परिवार व पुरजन यांसह पादमार्गे त्यांच्या दर्शनास गेला. मुनीश्वरांना तीन मद-क्षिणा घालून त्यांची पूजा, वंदना करून त्यांच्या समीप जाऊन बसला. कांहीं वेळ त्यांच्या मुखे धर्मोपदेश ऐकल्यावर राजा आपले दोन्हीं कर जोडून विनयानें त्यांना म्हणाला- हे गुरुराज ! अनंतसुखाला कारण असे एकादें व्रतविधान सांगावे तेव्हां मुनोश्वर म्हणाले, हे भव्योत्तम राजन् ! तुम्हीं आतां क्षायिक सम्यक्त्वव्रत है पालन करावें, म्हणजे तुमचे मनोरथ पूर्ण होतीलं असे म्हणून त्यांनीं त्याला सर्वविधि सांगि-तला. नंतर ते सर्व जन त्या मुनोश्वरांस प्रणिपात करून आपल्या नगरी परत आले. पुढे समयानुसार त्यांनीं है व्रत यथाविधि पाळिले. त्या योगानें स्वर्गसुख व क्रमाने मुक्तिधुख प्राप्त करून घेतले. असा याचा दृष्टांत आहे.