व्रतविधि – वरील प्रमाणे सर्व विधि करावा. त्यांत फरक-ज्येष्ठ शु. ९ दिनीं एकमुक्ति आणि १० दिवशीं उपवास, पूजा वगैरे पात्रांत एक पान मांडणें, णमोकार मंत्राचा जप एक करणे, एका मिधु-नास मोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करणे वगैरे.
– कथा –
काशी पट्टणांत पूर्वी वज्रसेन नामक राजा राज्य करीत होता. तो मोठा पराक्रमो पण गुणवान् होता त्याला कुसुमावती नाम्नी एक सुंदर, गुणवती पट्टस्त्री होती. त्यांना वज्रदंत नावाचा एक पुत्र असून त्याला सुमती नामें स्त्री होती. त्यांचा सुबुद्धी नांवाचा मंत्री असून त्यालाडि सुमती नांत्राची स्त्री होती. तसेच चंद्रशेखर पुरोहित व त्याला चंद्राननी नामाची स्त्री होती. आणि धनपाल नांवाचा राजश्रेष्ठी व त्यास घनवती नामें स्त्री होती. अशा या सर्व परिवारासह तो राज्जा सुखसंकथेत विनोदाने कालक्रमण करीत होता.
एके दिवशीं त्या नगराच्या बहिरुद्यानांत श्रीधराचार्य आपल्या संघासह येऊन उतरले. ही शुभवार्ता राजांस कळतांच तो आपल्या पुरजन व परिजन यांसह वर्तमान त्यांच्या दर्शनास गेला. मुनीश्वरांस तीन प्रदक्षिणा घालून वंदना करून त्यांच्यासमीप जाऊन बसला. कांहीं काल धर्मोपदेश ऐकल्यावर तो मोठ्या विनयानें दोन्ही हात जोडून त्यांना म्हणाला, – हे दीनोद्धारक गुरुवर्य ! आज आपण आम्हांस सद्गति सुस्खाला कारण असे एकादें व्रतविधान निरूपण करावें. हे त्याचे नम्रवचन ऐकून ते मुनींद्र त्यांस म्हणाले, -भव्यशिरोमणे राजेंद्रा ! आतां तुम्हांस अनंतदर्शन हे व्रत पालन करण्यास उचित आहे, असे म्हणून त्यांनीं त्यांना त्याचा सर्वविधि सांगितला. ते सर्व ऐकून त्या राजांस व इतर सर्व लोकांस अत्यंत आनंद झाला. मग सर्वांनीं त्या श्रीधराचार्यवयाँस नमस्कार करून हे व्रत स्वीकारिलें, नंतर सर्व जन नगरीं परत आले. पुढे कालानुसार है व्रत यथाविधि पाळिले. या व्रतपुण्याने त्यांनी स्वर्ग-सुख व कमाने मोक्षसुख प्राप्त करून घेतले.