व्रतविधि – वरील प्रमाणेंच सर्वविधि करावा. त्यांत फरक ज्येष्ठ शु. १३ दिनीं एकमुक्ति आणि १४ दिवशीं उपवास, पूजा वगैरे पात्रांत एक पान लावणें, णमोकार मंत्राचा जप एक करणे, एका दंप-तोस मोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करणे.
– कथा –
पूर्वी भोगपूर नांवाच्या नगरांत अरिदमन नांवाचा राजा गुणमती नामक पट्टराणीसह सुखार्ने कालक्रमण करीत होता. त्यांना एक सुंदर सिंहधर नांवाचा पुत्र आणि मनोरमा नावाची सून होती. वसुदत्त राजश्रेष्ठी व त्याची पत्नि वसुमति इत्यादि सर्व परिवार होता. सर्वांनीं अमलबुद्धि व विमलबुद्धि नावाचा दोषा चारण मुनीश्वरांजवळ है व्रत घेऊन पालन केले. त्यायोगाने त्यांना स्वर्गसुख व क्रमाने मुक्तिसुख प्राप्त झाले आहे. असा दृष्टांत आहे.