व्रतविधि – वरीलप्रमाणे सर्वविधि करावा त्यांत फरक ज्येष्ठ शु. १४ दिन्नों एकमुक्ति आणि १५ दिवशी उपवास, पूजा वगैरे पात्रांत पार्ने दोन लावणे, णमोकार मंत्राचे जप दोन करणें, दोन मिथुनांस भोजन करवून वश्वादिकांनी त्यांचा सन्मान करणें.
– कथा –
पूर्वी विजयपूर नगरांत विजयसेन राजा आपल्या विजयावती पट्टराणोसइ सुखाने राज्य करीत होता. जयवंत नामें प्रधान व त्याची भार्या जयावती, त्रिशालकीर्ति पुरोहित त्याचो पत्नि कुशलमती, प्रियदत्त राजश्रेष्ठी आणि त्याची स्त्री प्रियमित्रा या सर्व परिवारासह तो हास्यविनोदांत काल घालत्रीत होता. या सर्वांनीं जयविजय नामक चारणमुनिद्वयाजवळ हे व्रत घेऊन यथाविधि पाळिले. म्हणून ते सर्वजन स्वर्गास व क्रमाने मोक्षास गेले आहेत. असा दृष्टांत आहे.