व्रतविधि – वरील प्रमाणें सर्वविधि करावा. त्यांत फरक-ज्येष्ठ कृ. १ दिनीं एकमुक्ति आणि २ दिवशी उपवास, पूजा वगैरे. पात्रांत तीन पाने लावणे, णमोकार मंत्राचे तीन जप करणे, तीन मिथु-नांस भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करणे.
– कथा –
पूर्वी आनंदपुर नगरांत सुप्रतिष्ठ नामक राजा लक्ष्मीमति नाम्नी पट्टराणीसह राज्य करीत होता. त्यांना सुरेंद्र नांवाचा पुत्र आणि त्याची मार्या कमलावती नामें होती. त्यांचा प्रधान नीतिसागर नांवाचा व त्याला शीलवती नाम्नी पत्नी होती. सुरकीर्ति नामक पुरोहित व त्याला कामरूपिणी नांवाची स्त्री होती. लक्ष्मीकांत नांवाचा राजश्रेष्ठो आणि त्याला लक्ष्मीपति नांवाचो गृहिणी होती. इत्यादि सर्व परिवारासह तो फालक्रमण करीत होता. या सर्वांनीं एकदां मुनिगुप्ताचार्य यांच्या जवळ है व्रत धारण करून त्याचे यथावत् पालन केले. त्यामुळे ते सर्व स्वर्गास व क्राने मोझास गेले आहेत. असा दृष्टांत आहे