व्रतविधि – वरील प्रमाणे सर्व विधि करावा. त्यांत फरक-ज्येष्ठ कृ. २ दिनीं एकभुक्ति आणि ३ दिवशीं उपवास, पूजा वगैरे. पात्रांत चार पार्ने लावणें, णमोकार मंत्राचे जप चार करणे, चार मिथु-बांस भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करणे.
– कथा –
पूर्वी सुरेंद्रपूर नांत्राच्या नगरांत शूरसेन नांवाचा राजा आपल्या स्वरूपवती नांत्राच्या पट्टराणीसह राज्य करीत होता. त्यांना महासेन नांवाचा पुत्र व सत्यवती नामे सून होती. त्यांचा रत्ननिधी नांवाचा प्रधान व स्याची पत्नी रत्नावली तसेच श्रुतकीर्ति पुरोहित आणि त्याची भार्या शारदादेवी, कुबेरदत्त राजश्रेष्ठी व त्याची स्त्री धनावली नांवाची होती. असा राजाचा परिवार होता. या सर्वांनी एकदां अनंतसेनाचार्य गुरुजवळ हे ब्रन ग्रहण करून त्याचे यथाविधि पालन केले. त्यायोगे त्यांना स्वर्ग व क्रमाने मुक्ति मिळाली आहे. असा दृष्टांत आहे.