व्रतविधि – वरील प्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक -ज्येष्ठ कृ. ३ दिनीं एकमुक्ति आणि ४ दिवशीं उपवास, पूजा वगैरे पात्रांत पांच पाने लावणे, णमोकार मंत्राचे पांच जप करणे, पांच मिथुनास भोजन करवून त्यांचा वस्त्रादिकांनी सन्मान करणे.
– कथा –
पूर्वी देवीजपूर नांवाच्या नगरांत देवध्वज नांवाचा राजा देविली पट्टराणीसह राज्य करीत होता. त्यांना देवकुमार पुत्र व देवमालिनी सून, तसेंच सुमनोहर प्रधान आणि त्याची स्त्री सुमती, चारुकीर्ति नामे पुरोहित त्याचो भार्या चारुमति, अर्हद्दात राजश्रेष्ठी व त्याला प्रियमित्रा पत्नि असा परिवार होता एकदां या सर्वांम देवध्वज राजानें सुभद्राचार्य नामक गुरुजवळ हैं व्रत स्त्रोकारून त्याचे यथाविधि पालन केलें. त्यामुळे त्यांना स्वर्गाची व क्रमाने मुक्तीची प्राप्ति झाली आहे. असा दृष्टांत आहे.