व्रतविधि – वरीलप्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक ज्येष्ठ कृ. ४ दिनीं एकभुक्ति आणि ५ दिवशीं उपवास, पूजा वगैरे पात्रांत सहा पार्ने लावणे, सहा मिथुनांस भोजन करवून त्यांचा सन्मान वस्त्रा-दिकांनीं करणे णमोकार मंत्राचे जप ६ सहा करणे.
कथा-
पूर्वी गजपूर नगरांत गजदंत राजा गजावती राणीसह राज्य करीत होता. त्याला गजकुमार पुत्र आणि गजसेना सून; विश्वानुलोभमंत्री व त्याची स्त्री विश्वलोचनी; शशिकीर्ति पुरोहित आणि त्याची भार्या मंगलावती, गुणपाल राजश्रेष्ठी व त्याची पत्नी गुणवंती असा परिवार होता. या सर्वांनीं एकदां विद्यासागर नामक मुनीजवळ हे व्रत घेऊन त्याचे यथाविधि पालन केले. त्यामुळे त्यांना स्वर्गसुख आणि क्रमाने अपवर्ग सुख मिळाले. असा याचा दृष्टांत आहे.