व्रतविधि – वरील प्रमाणें सर्वविधि करावा. त्यांत फरक ज्येष्ठ कृ. १० दिनीं एकभुक्ति आणि ११ दिवशी उपवास, पूजा वगैरे. पात्रांत तोन पार्ने लावणें, णमोकार मंत्राचे तीन जप करणें, तीन मिथु-नांस भोजन करवून वस्त्रादिकांनी त्यांचा सन्मान करणे.
– कथा –
पूर्वी शांतभद्रपूर नगरांत भद्रसेन राजा भद्रादेवी पट्टराणीसह राज्य करीत होता. त्यानां सुभद्र पुत्र व वसुभद्रा सून होती. त्याशि वाय वसुमती मंत्री व त्याची स्नो वनुकांता, वसुधाचार्य पुरोहित व त्याची भार्या वसुमती, सुकांत श्रेष्टी व त्याची पत्नि सुदत्ता असा परि-वार होता. एकदां या सर्वांनीं एकदां उद्यानांत वसुंधराचार्य मुनीश्वरां जवळ है बत्र स्वीकारून पुढे त्याचे यथाविधि पालन करून स्वर्ग आणि क्रमानें अपवर्ग संपत्ति मिळविली आहे. असा दृष्टांत आहे.