व्रतविधि – वरील प्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक -आषाढ शु. ११ दिनीं एकमुक्ति व १२ दिवशीं उपवास, पूजा वगैरे. पात्रांत चौदा १४ पार्ने लावणे, चौदा १४ मुनींना शास्त्र, जपमाळादि देणे, चौदा मिथुनांस भोजन करवून वस्त्रादिकांनीं त्यांचा सन्मान करणे. १०८ कमलपुष्पे व १०८ आंब्याचीं फले अर्थवींत. १०८ जिनचै-त्यालयांचे दर्शन करणे.
– कथा –
पूर्वी रजतपूर नगरांत राजशेखर राजा राजमती पट्टस्त्रीसह राज्य करीत होता. त्यांना रजतसेन नामक पुत्र व त्याची पत्नि रजतलोचनी होती. तसेंच मंत्री, श्रेष्ठी, पुरोहित, सेनापति इत्यादि परिवार होता. एकदां त्यानीं रजतसागर महामुनोजवळ हे व्रत घारण केले आणि त्याचे यथाविधि पालन केले त्यामुळे त्यांना स्वर्गाची व क्रमाने मोक्षाची विभूति प्राप्त झाली आहे. असा दृष्टांत आहे