व्रतविधि – मार्गशीर्ष शुक्लाक्षांतील पहिल्या शनिवारी या व्रति-कांनीं एकभुक्ति करात्री. आणि रविवारीं प्रातःकाळीं शुद्धपाण्यानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतवस्त्रे धारण करावींत. सर्व पूजाद्रव्यें हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्याप-यशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. पीठावर विमलनाथ तीर्थकर प्रतिमा पाताळयक्ष व वैरोटी यक्षीसह स्थापून तिला पंचामृतांनीं अभिषेक करावा. एका पाटावर तेरा स्वस्तिके काढून त्यांवर पार्ने, अक्षता, फुले, फळें वगैरे ठेवावे. अष्ट द्रव्यांनीं तीर्थकरांची अर्चना करावी. श्रुत व गणधर यांची पूजा करून यक्ष, यक्षो व ब्रम्हदेव यांचे अर्चन करावें. पंचपक्वान्नांचे चरु करावेत. ॐ ह्रीं श्रीं क्लीं ऐं अर्हं विमलनाथतीर्थंकराय पाताळयक्ष वैरोटोयक्षीसहिताय नमः स्वाहा ।। या मंत्राने १०८ पुष्पें घालावीत.
एके दिवशीं आहारानिमित्त यशोधर नांवाचे महामुनीश्वर राज-वाड्या जवळ आले. तेव्हां त्या जयसेन राजाने त्याचे यथा योग्य प्रतिग्रहण करून त्यांना आपल्या पाकशाळेत नेलें व यथाविधि आहार-दान दिले, त्यानंतर ते मुनि तेथे एका आसनावर बसले. तेव्हां त्यांनीं कांहीं वेळ धर्मोपदेश दिला. ते ऐकून त्या राजानें आपला मत्रप्रपच विचारिला. मग त्यांनीं त्यांस त्यांचा सर्व भवप्रपंच सांगितला. ते ऐकून सर्वांना मोठा संतोष झाला. तेव्हां त्या राजाने ते सगरचक्रवर्त्तिव्रत स्त्रीकारिले. मग ते मुनीश्वर सर्वांना आशिर्वाद देऊन आपल्या स्थानीं गेले. पुढ़ें त्याने योग्यकालीं ते व्रत यथाविधि पाळून त्याचे उद्यापन केले.
कांहीं दिवसानीं पुनः ते सर्व पुत्र आपल्या पित्याजवळ येऊन त्यांना नमस्कार करून म्हणाले, हे पूज्य पिताजी ! आतांपर्यंत आम्ही आपल्या आज्ञेप्रमाणे पुष्कळ भोगापभोग भोगला. यांत पुष्कळ फाल गेला. कांहीं तरी योग्य कार्य करून दाखवावे अशी प्रबल इच्छा आहे. ” आज कोणतेही कार्य आम्हांस सांगितल्याशिवाय आम्ही भोजन करणार नाहीं. ” अशी आमची प्रतिज्ञा आहे. तरी आपण आम्हांस कोणतेही कार्य करावयास सांगावे. आग्रहाचे व निर्धाराचे भाषण ऐकून ते चक्रवर्ति म्हणाले, हे पिय पुत्रांनो ! त्या कैलास पर्वतावर पूर्वी प्रथम चक्रवर्ति श्री भरतेशांनी तीर्थकरांची सुवर्णमय जिनमंदिरे बांधवून ठेवलीं आहेत. आणि त्यांत अमूल्य रत्नमयी प्रतिमा स्थापन केल्या आहेत. पंचमकालीं अत्यंत विषयमोही लोक उत्पन्न होणार असल्याने त्यांचे संरक्षण होणे अशक्य आहे. या करितां तुम्ही तेथे जाऊन त्या पर्वता सभोवती एक मोठा खंदक तयार करून त्यांत गंगानदीचे पाणी आणून सोडा. हे ऐकून सर्वांना मोठा आनंद झाला आणि ते त्यांना नमस्कार करून आपले आज्ञेपमाणे कार्य करितों म्हणून सांगून कैलास-पर्वतावर निघून गेले, आणि त्यांनी मोठ्या परिश्रमाने त्या चक्रवर्तिच्या हातांतील दंडरत्नाच्या साह्याने थोडक्याच अवधींत खंदक तयार केला. मग ते गंगा नदीचे पाणी आणण्यासाठी हिमवान पर्वतावर गेले. ही वार्ता आरण स्वर्गातील मणिकेतु देवास समजतांच तो तत्काळ तेथे आला. आणि त्यानें भयंकर दृष्टिविषधर सर्वरूप धारण करून मोठा विषारी फुत्कार सोडला त्यायोगार्ने ते सर्व राजपुत्र मूर्छित होऊन मृतवत् पडले. ही हकिगत प्रधान मंडळीस समजली, पण त्यानीं पुत्रमोहानें चक्रवर्तिस महान् दुःख होईल म्हणून त्यांना ती हकिगत क्ळावेली नाहीं
तेव्हां तो मणिकेतु देव ब्राम्हण वेष धारण करून त्या चक्रव-तिच्या सभेत गेला, आणि मोठ्या दुःखाने रडत रडत त्यांस म्हणूं लागला, हे राजाधिराज ! माझा एकुलता एक पुत्र होता, तो द्रव्य मिळवून माझा उदरनिर्वाह करीत होता. पण आतां माझें दैव फुटले आहे. तो अकस्मात् मरण पावला. आतां तो मला कसा प्राप्त होईल अशी मला काळजी लागली आहे. ती आपल्याशिवाय दूर होणें अशक्य आहे. याकरितां मी आपल्या चरणीं शरण आलों आहे. तरी आपण त्याला कोणताही उपाय करावा. अशी माझी विनंती आहे. हैं त्याचे वचन ऐकून त्या चक्रवर्तीत मोठें हसूं आलें. तेव्हां तो चक्रवति त्या ब्राम्हणांस म्हणतो, हे विप्र महाराज ! तुम्ही मोठे भोळे आहात. जो मरण पावतो तो पुनः जिवंत कप्ता होईल ? काल हा केव्हां ही म्हातारा असो, तरुण वा बालक असो. निर्दय असतो. तो कोणी त्याला हिरावून नेतोच. त्याच्यापुढे कोणाचाच उपाय चालत नाहीं.आतां कांहीं दिवसांनी तुम्हांस ही तो काळ लौकरच ओढून नेणार आहे. जर आपण आपली रक्षा करून घ्यावयाची इच्छा असेल; तर तुम्ही जिनदीक्षा धारण करून आपण आपले कल्याण करून घ्यावें. हे योग्य आहे, वगैरे हे ऐकून तो ब्राम्हण म्हणतो, जर त्या काला-पासून आपली सुटका होत नाहीं तर निरुपाय आहे. असो. महाराज ! एक आवश्यक गोष्ट आपणांस सांगावयास विसरलों आहे. याकरितां आपण मजवर क्षमा करावी. ती गोष्ट ही कीं, जेव्हां भी रस्त्यांतून इकडे येत होतो तेव्हां लोक परस्परांत बोलत होते कीं; – फार वाईट झाले. महाराजांचे जे साठ हजार पुत्र कैलास पर्वतावर खंदक खणण्या-साठीं गेले होते; ते सर्व अकस्मात् मरण पावले.. है ब्राम्हणाचे वाक्य पुरे होते न होते, तोंच ते सगरचक्रवर्ति राजे एकदम मूर्छित होऊन पडले. तेव्हां सेवकांनीं शीतोपचार करून त्यांना शुद्धीवर आणिले. ही संधी पाहून त्या वेषधारी ब्राम्हणाने (मणिकेतु देवानें) त्यांना या क्षणिक संसाराविषयीं वैराग्य उत्पन्न होण्यासारखा धर्मोपदेश केला. त्यायोगानें त्या वेषधारी ब्राम्हणाचे इष्ट कार्य सफल झालें.
तो मुनिसंघ विहार करीत करीत श्रीसम्मेदशिखरजीवर आला. तेथे ते सर्व मुनीश्वर घोरतपश्चर्येने सर्व कर्माचा क्षय करून मोक्षास गेले. ही वार्ता त्या भगीरथ राजांसहि समजतांच संसारत्याग करण्याची प्रबळ इच्छा झाली. तेव्हां त्याने आपला पुत्र जो वरदत्त त्याला सर्व राज्यभार दिला. आणि कैलास पर्वतावर जाऊन शिवगुप्त मुनीजवळ त्यानें दीक्षा घेतली.