व्रतविधि – वरील प्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक ज्येष्ठ शु. ११ दिनीं एकसुक्ति आणि १२ दिवशी उपवास, पूजा वैगेरे. पात्रांत तीन पार्ने लावणे, णमोकार मंत्राचे जप तीन दंपतीस भोजन करवून त्यांचा वस्त्रादिकांनीं सन्मान करणे.
पूर्वी रत्नसंचय नगरांत मेघवाहन या नांवाचा राजा आपल्या मेषमालिनी नामक पट्टराणीसह राज्य करीत होता. त्यांना मेघश्याम नाने पुत्र व त्याला रत्नमालिनी नांवाचो स्त्रो होतो. त्यांचा चारित्रसेन नामें प्रधान असून त्याला चारित्रभति भार्या होती. आणि शारदानंद नामक पुरोहित व त्याला कुसुमावली नाम्नो पत्नि होती. तसेच सुरें-द्रदत्त श्रेष्ठो आणि त्याचो गुणमाला नावाचो प्राणवल्लभा होतो. असा त्याचा सर्व परिवार होता.
एके दिवशीं त्या नगराच्या बहिरुथानांत सुधर्माचार्य आपल्या संघासह आले. है शुभवृत्त कळतांच तो राज्जा आपल्या सर्व परिवारासह मोठ्या थाटानें पादमार्गे त्यांच्या दर्शनास गेला. तेथे त्यांना प्रदक्षिणा, वंदना करून त्यांच्या समीप जाऊन बसला. कांहीं वेळ धर्मश्रवणा-नंतर राजानें मोठ्या विनयाने दोन्ही हात जोडून प्रश्न केला. हे भव-सिंधुतारक गुरो ! आतां आपण आम्हांस अनंतसुखाका कारण असे एकादें व्रतविधान निरोपावे. हे त्याचे नम्रवचन ऐकून ते त्यांना म्हणाले, – हे भव्यचूडामणे राजन् ! आतां तुम्हाला अनंतवीर्य है व्रत पालन करण्यास अगदीं उचित आहे. असे म्हणून त्यांनी त्यांना त्याचा सर्वविधि सांगितला. ते ऐकून सर्वांस मोठा आनंद झाला. मग त्यांनीं है व्रत त्यांच्या समीप ग्रहण केले. नंतर सर्वजन नगरींत परत आले. पुढे कालानुसार त्यांनी है व्रत यथाविधि पाळून त्या पुण्योदयानें स्वगीचे व क्रमाने अपवर्गाचे सौख्य संपादन केले.