व्रतविधि-वरील प्रमाणे सर्वविधि करावा. त्यांत फरक -ज्येष्ठ शु. १० दिनीं एकमुक्ति आणि ११ दिवशीं उपवास, पूजा वगैरे. पात्रांत दोन पार्ने मांडणे, णमोकार मंत्राचे जप दोन करणे, दोन मिथुनांस भोजन करवून त्यांचा वस्त्रादिकांनीं सन्मान करणे.
– कथा-
हे व्रत पूर्वी इस्तिनापुरांत विमलसेन नांवाचा राजा आपल्या विमलावती नामे पट्टराणी सह सुखाने राज्य करीत होता. त्यांना कमलनाथ नांवावा एक सुंदर पुत्र होता. त्याची कमलावती नाम्नी स्त्री होती. त्यांचा बुद्धिसागर नांत्राचा मंत्री असून त्याला मतिवंती नांवाचो स्त्री होती. तसेच धवलकीर्ति नांवाचा पुरोहित व त्याला गुणवती नांवाची पत्नि होती. आणि गंगदत्त नांवाचा श्रेष्ठी व त्याला गंगदेवी नामें भार्या होती. इत्यादि सर्व परिवारासह तो सुखाने कालक्रमण करीत होता.
एकदां आपल्या नगराच्या उद्यानांत सूर्यमित्र नांवाचे महान् आचार्यसंघासह आल्याचे वृत्त कळतांच तो आपल्या सर्व परिवारासह त्यांचे दर्शनास गेला. त्यांना प्रदक्षिणा घालून वंदना, पूजा करून त्यांच्या समीप जाऊन बसला. कांहीं काल धर्मोपदेश श्रवण केल्यावर त्यांना मोठ्या विनयार्ने म्हणाला, – हे संसारसिंधुतारक स्वामिन् ! आम्हांस सर्व सुखाका कारण असे एकादें व्रतपूजन सांगा. तेव्हां ते म्हणाले, – हे भव्योत्तम राजन् ! तुम्हांस अनंतज्ञानव्रत है पालन करण्यास अत्यंत योग्य आहे. असे म्हणून त्यांनी त्याचा सर्वविधि सांगितला. तो ऐकून सर्वांना संतोष झाला. मग सर्वांनीं ते व्रत ग्रहण केलें. नंतर सर्वजन त्यांना नमस्कार करून नगरी परत आले. पुढे समयानुसार त्यांनीं है व्रत यथाविधि पाळून त्यायोगें स्वर्गसुख व क्रमाने मोक्षसुख मिळविले.