व्रतविधि – माघ शु. ४ दिनीं या व्रतिकांनीं एकभुक्ति करावी. आणि १ दिवशीं प्रभातीं शुचि जलाने अभ्यंग स्नान करून अंगा-वर दृढ धौत वर्षे धारण करावीत. सर्व पूजाद्रव्ये हातीं घेऊन जिनालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास भक्तीने साष्टांग प्रणिपात करावा. देवापुढे नंदादीप लावावा. पीठावर सन्मति (भूतकाल) तीर्थकर प्रतिमा यक्ष यक्षीसह स्थापून अभिषेकाच्या मंत्राने त्यांचा पंचामृतानीं अभिषेक करावा. शुद्ध पाटावर दहा स्वस्तिके काढून त्यांवर दडा पार्ने मांडावीत. आणि त्यांच्यावर अष्टद्रव्ये लावावीत. निर्वाणादि सन्मतीनाथ (भूतकाल) तीर्थंकरांचीं अष्टद्रव्यांनीं पूजा करावी, पंचपकानांचे चरु करावेत. श्रुत व गुरु यांचो अर्चना करावीं. यक्ष, यक्षी व ब्रम्हदेव यांचे पूजन करावें. ॐ ह्रीं अर्हं सन्मति जिनाय यक्षयक्षीसहिताय नमः स्वाहा ॥ या मंत्राने १०८ पुणे घालावींत. णमोकार मंत्राचा १०८ वेळां जप करावा. श्रीजिनसहस्रनामस्तोत्र म्हणून सन्मति प्रभूचे चरित्र वाचावे. ही व्रतकथाहि वाचावी. नंतर एका पात्रांत दहा पार्ने मांडून त्यांवर अष्टद्रव्ये आणि एक नारळ ठेवून महार्द करावा. आणि त्याने ओवाळोत तीन प्रदक्षिणा घालून मंगलारती करावी, त्या दिवशी उपवास करून घमेध्यानांत काल घालवावा. सत्या-श्रांत व्याहारादि दाने यावीत. दुसरे दिवशीं पूजा व दान करून आपण पारणे करावे.
बापमाणे दे बतपूजन महिन्यांतून एकदां त्याच तिथीस करावे. अशा दहा पूजा पूर्ण झाल्यावर कार्तिक अष्टान्हिकांत या व्रताचे उद्यापन करावे. श्रीसन्मति तीर्थंकराचे त्यावेळी विधान करून महाभिषेक करावा. चतुःसंघास आहारादि दाने द्यावीत. दीन अनाथांना अभयदान द्यावे. १० मिथुनांस आपल्या घरीं भोजन करवून त्यांच्या ओटींत फल, पुष्प, गंधाक्षता, पान सुपारी, नारळ वगैरे घालून त्यांचा सन्मान करावा. असा या व्रताचा पूर्ण विधि आहे.
हे व्रत पूर्वी यथाविधी पाळल्यामुळे ज्यांना उत्तम मोक्ष सुख प्राप्त झाले आहे. त्यांचो कथा येथे तुम्हांस सांगत्तों; ते तुम्हीं लक्ष देऊन ऐका –
– कथा –
श्रीअनंतनाथ तीर्थंकरांच्या तीर्थसंतान कालामध्ये चंद्रसेन नांवाचा राजपुत्र त्यांच्या समवसरणांत गेला होता. तो तीन प्रदक्षिणा-पूर्वक वंदनादि करून मानत्र कोष्ठांत जाऊन बसला. असतां, – त्यांच्या मुखकमलांतून प्रकट होणाऱ्या दिव्यध्वनींचा घर्मोपदेश कांहीं वेळ श्रवण केल्यावर तो मोठ्या विनयानें दोन्हीं करकमले जोडून श्रीजयार्य गण-धरांस म्हणाला, हे भवसिंधुतारक स्वामिन् ! आतां आपण आम्हांस सर्व सुखाला कारण असे एकादें व्रतविधान निरूपण करावें. हे त्याचे नम्र भाषण ऐकून ते गणेंद्र त्यास म्हणाले, हे भव्य राजन् ! आतां हरिषेण चक्रवर्तिव्रत है तुम्हांस पालन करण्यास अत्यंत उचित आहे. असे म्हणून त्यांनीं त्या व्रताचा सर्व विधि सांगितला. ते ऐकून त्याला मोठा आनंद झाला. मग त्यानें से व्रत त्यांना वंदना करून घेतले. नंतर तो आपल्या नगरी परत आला पुढे त्याने ते व्रत यथाविधि पाळून त्याचे उद्यापन केले.
पुढे एके दिवशी रात्री तो चंद्रसेन राजवाड्याच्या गच्चीवर बसला असतो, आकाशांतून होणारा उल्कापात त्याच्या दृष्टीस पडताच, त्याच्या मनांत या क्षणिक संसाराविषयीं वैराग्य उत्पन झाले. मग वनांत जाऊन त्याने एका मुनिराजांजवळ जिनदीक्षा घेतलो, आणि तो घोर-तपश्चर्या करून कालांतराने समाधिविधीने मरून सानरकुमार स्वाँत देव झाला. तेथे तो चिरकाल स्वर्गीय सुख भोगून आयुष्यांती तेथून ८श्वून – या जंबूद्रोपांतील भरतक्षेत्रांत भोगपूर या नांवाचे एक सुंदर नगर असून तेथे इक्ष्वाकुवंशींचा पद्मनाथ नांवाचा एक मोठा पराक्रमी, नीतिमान् असा राजा राज्य करीत होता. त्याला मनोहरा या नांवाची एक राणी होतो. यांच्या पोटीं तो पूर्वोक्त स्वर्गीय देव इरिषेण नामक पुत्र झाला. या सर्वांसह तो पद्मनाथ सुखाने राज्योपभोग करीत असता, त्याच्या मनांत आपल्या पुत्रास तरुणावस्था प्राप्त झाल्याचे पाहून या संसाराविषयी वैराग्य उत्पन्न झाले. तेव्हां तो आपल्या हरि-पेण पुत्रास सर्व राज्यभार देऊन वनांत गेला. आणि तेथे एका सुनीश्व-रांजवळ निर्भय दीक्षा घेऊन तपश्चर्या करूं लागला.
इकडे तो हरिषेण राजा श्रावकांचीं व्रते घेऊन उत्तम रीतीने पाळू लागला. पुढे कांहीं दिवसांनी त्या पद्मनाथ मुनीश्वरांस केवलज्ञान उत्सन्न झाले. त्याचवेळीं त्या हरिषेण राजाच्या आयुध शाळेत असि, छत्र, चक्र वगैरे चौदा रत्ने व गृहीं शंख, नैसर्थ वैगैरे नऊ निधी उत्पन्न झाले. ही शुभवार्ता त्या हरिषेण राजास समजतांच तो त्या वृत्तहारकांस आपल्या अंगावरील वस्त्रालंकार देऊन प्रथम त्या पद्मनाथ केवली मुनींची पूजा करण्यासाठीं गेला. तेथे गेल्यावर तो त्या केवली मुनींस मोठ्या भक्तीनें तीन प्रदक्षिणापूर्वक नमस्कारादि करून नगरी परत रत्नाची पूजा केली. आपल्या नगरी परत सर्वांनी मिळून त्याला आला. नंतर त्यानें आयुष शाळेत जाऊन त्या चक्र मग तो दिग्विजयास जाऊंन षट्खंडपृथ्वीं साधून आला. तेव्हां राजे, महाराजे, विद्याधरराजे वगैरे साम्राज्याभिषेक केला. पुढें तो पुष्कळ काल साम्राज्यैश्वर्याचा अनुभव घेऊ लागला.
कार्तिक अष्टान्हिकाचा पर्व आला. त्यावेळी त्या हरिषेण चक्रवर्तीन स्वयं साधक बनून आपल्या जिनमंदिरामध्ये अष्टान्दिकपूजारंभ केला. तो विधिपूर्वक यथाशक्ति उपवास करूं लागला. असा क्रन चालं. अत्ततां, पौर्णिमेदिवशीं चंद्रग्रहण पाहिल्यामुळे त्याच्या मनांत एकदम वैराग्य उत्पन्न झाले. मग तो आपल्या महासेन नामक पुत्रांस सर्व साम्राज्यभार देऊन सीमंत पर्वतांतील नाग केवींच्या समीप गेला. त्यांना तीन प्रदक्षिणा घालून मोठ्या भक्तीनें वंदनादि करून त्याने त्यांच्याजवळ जिनदीक्षा घेतली. घोरतपश्चरण करून तो अंर्ती समाधि-विधीने मरण पावून तो हरिषेणमुनि सर्वार्थसिद्धीत अहमिंद्रदेव झाला. तेथे तो देव चिरकाळ पुष्कळ सुख भोगूं लागला. असे याचे माहात्म्य आहे.