३२. कल्याणमाला व्रतकथा.
कल्याणमाला व्रतकथा. व्रतविधि – आषाढ, कार्तिक, फाल्गुन या तीन आष्टान्हिक पर्वात १० दिवशी या व्रतधारकांनी प्रभातीं अभ्यंगस्नान करून अंगा- वर दृढधौत वस्खें धारण करावीत. सर्व पूजासामग्री हातीं घेऊन जिना- लयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियां- पूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर पार्श्व- नाथ तीर्थकर प्रतिमा धरणेंद्र यक्ष पद्मावती यक्षीसह स्थापून त्यांस…